कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अकलापूरात पारंपरिक जल्लोषात बैलपोळा साजरा!

 अकलापूरात पारंपरिक जल्लोषात बैलपोळा!


शेतकऱ्यांचा लाडक्या सर्जा-राजाची सजूनधजून गावातून काढली मिरवणूक 



नवनाथ गाडेकर/घारगांव

संगमनेर तालुक्यातील पठार भागात बैलपोळा उत्साहात साजरा होत असून, यंदा अकलापूर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला.


गावातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाला नटवून थटवून एकत्र जमले होते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलाला आकर्षक गोंडे, पायातील घुंगरांचा पट्टा, पाठीवर रंगीबेरंगी झुल, पितळी घंटा आणि प्लास्टिकच्या कवड्यांच्या माळांनी सजवलं होतं. सजलेल्या बैलांच्या थाटामाटाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


वाद्यांच्या गजरात मिरवणूक, गुलालाची उधळण

गावभर काढलेल्या भव्य मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, सनई-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालावर ग्रामस्थांचा उत्साह उंचावला होता. गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी या जल्लोषात भर घातली.

व्हिडिओ 


मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला गुडघ्यावर बसून हनुमानरायांचं दर्शन घडवलं. त्यानंतर अकलापूर गावचे ग्रामदैवत स्वयंभू दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी बैलांना नेण्यात आले होते .या क्षणी संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारून गेला होता.


कृतज्ञतेचा दिवस – बैलपोळा

अकलापूरात गेल्या अनेक वर्षांपासून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा टिकून आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा साजरा करतात. सकाळी सर्जा-राजाला अंघोळ घालून, सजवून, पूजा करून हा सण शेतकरी आणि बैलांमधील प्रेमाचा सोहळा बनतो.


 “बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती आहे. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या या जीवावर आपण ऋणी आहोत. त्यामुळे बैलपोळ्याचा दिवस हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा दिवस आहे.”


ग्रामस्थ अकलापूर



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु