कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

 


संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागातील घारगांव परीसरातील निसर्ग रम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या कळमजाई मंदिर परीसरातील धबधब्याखाली बुडुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली

याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जहीर रफीक शेख (वय १७) राहणार आंबीखालसा हा कळमजाई मंदिर परीसरात आपल्या दोन भावांसोबत फिरण्यासाठी गेला होता.तर त्यानंतर ते तीघेही पोहण्यासाठी तलावात उतरले होते त्याच दरम्यान तो बुडाला ही घटना  आजुबाजुच्या उपस्थित पर्यटकांच्या लक्षात येताच त्यास पाण्याबाहेर काढून खाजगी रुग्णवाहिकेतून त्याला घारगांव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यास मयत घोषीत केले.

कळमजाई हे निसर्ग पर्यटन स्थळ असून असंख्य पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येत असतात परंतु काही पर्यटक हे तेथील धबधब्याखाली तलावात पोहण्यासाठी साठी उतरत असतात. आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरून नये. अथवा गवताच्या ठिकाणी सापांची भिती असल्याने फीरू नये.

रामदास थेटे

वनपरीमंडळ अधिकारी घारगांव



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु