कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

 पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित



 स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय धार्मिक  क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो यावर्षीचा आदर्श राज्यस्तरीय  पत्रकारिता पुरस्कार  संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिव्य मराठीचे प्रतिनिधी  सुभाष भालेराव यांना आदर्श पत्रकारिता  पुरस्कार देऊन  सन्मानित  करण्यात आले  अहिल्यानगर मधील माऊली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 



 कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावशे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पत्रकार सुभाष भालेराव यांचा  रविवारी (दि.18) रोजी  सन्मान करण्यात आला. 



 कृषी, शिक्षण, सहकार, राजकारण अशा संगमनेर तालुक्यातील ग्रामीण पत्रकारितेद्वारे न्याय देऊन अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत  त्यांचे विविध क्षेत्रातील  अभ्यासपूर्ण लिखान असते. त्यांनी पत्रकारितेचा प्रवास मोठ्या सचोटीने केला कार्यक्षम  निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला .

 





Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु