कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

दिंड्यांमधील वारकऱ्यांना पोलिसांचे संरक्षण कवच.

 दिंड्यांमधील वारकऱ्यांना पोलिसांचे संरक्षण कवच.


कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल खाकी वर्दीतील वारकरी



आळेफाटा (प्रतिनिधी -कैलास बोडके )सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावर अत्यंत भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या पायी दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ  होत असताना आपल्याला दसून येत आहेत,  पालखी सोहळ्यामुळे अनेक जिल्ह्यातून  लाखो वारकरी विविध  तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने  विठ्ठलाच्या भेटी साठी असंख्य  भाविक भक्त व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी  येत असताना त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्यामुळे .कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिंड्यां मधील वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष  सूचना दिल्या असून त्यांनी  एव्हढ्यावरच न थांबता ते स्वतःही  प्रत्यक्ष महामार्गावर खाकी वर्दी तील वारकरी बनून या लाखो वारकऱ्यांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह कडक बंदोबस्तात  संरक्षण देण्याचे काम करताना  निदर्शनास आले आहे.याबाबत नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत समाधान देखील व्यक्त होत आहे.  

       पुणे जिल्ह्याच्या टोकावरील  कल्याण- नगर महामार्गावरून पायी पालख्या जात असताना त्यातील वारकऱ्यांच्या संरक्षनासाठी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पंढरपूरला जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्यातील प्रत्येकाच्या संरक्षणार्थ  खबरदारी घेण्याविषयी  पुणे ग्रामीण हद्दीतील असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना  विशेष जबाबदारी  दिली असून ते स्वतः देखील पुणे जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी उन्हात रस्त्यावर उभे राहून संरक्षण देत असल्यामुळे पालखी सोहळ्यातील  वारकऱ्यांना खाकी वर्दीतील वारकऱ्यांचे दर्शन झाले त्यामुळे  दिंडीद्वारे सर्व पायी जाणारे वारकरी निर्धास्तपणे  मनोमन सुखावल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु