कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेरी चिखलठाण येथे अहिल्यादेवी होळकर जयंती मोठया थाटामाटात संपन्न

 



शेख युनूस अ. नगर.. राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम डोगराळ भागात युवक तरुणांनी ढोल ताशाच्या तालावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आली.


बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी चिखलठाण येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त म्हसकोबा वाडी येथून( म्हसकोबा मंदिर )येथून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ युवक,तरुणांनी विशेष सहभाग नोंदवला.अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक करण्यात आली. मिरवणूकीचा समारोह चिखलठाण येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आला.अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी यांचा आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महिलांना वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला.


अहिल्यादेवी होळकर जयंती वेळी रमेश फिरोदिया महाविद्यालय चे प्राध्यापक अस्वले सर यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते.अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त साहेबराव डोलनर यांनी अथक परिश्रम घेतले. सचिन काळनर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार रॉयल पाटील चे अशोकराव डोमाळे यांनी मानले.


यावेळी उपस्थित रॉयल पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव डोमाळे,राजाराम काकडे सर,आबासाहेब काळनर, संतोष शेठ काळनर, (भाऊ उद्योग समूह ),सुभाष बाचकर,धीरज टेमकर, विजय डोमाळे, सावित्रा डोमाळे,विनोद काळनर, बंटी काळनर, आदी युवक तरुण कार्येकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु