कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

खबरदार' दारू पिऊन वाहन चालवत असाल तर

 'खबरदार' दारू पिऊन वाहन चालवत असाल तर 



नशाबाज चालकांवर  ओतूर पोलिसांची करडी नजर.


आळेफाटा -(प्रतिनिधी कैलास बोडके )


गेल्या काही महिन्यात नगर कल्याण महामार्गावर झालेले अपघात दारूची नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे  झाले असल्याचे एका पहानीत आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांची संख्यादेखील वाढली होती मात्र अशा नशाबाज वाहन चालकांवर ओतूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे संभाव्य अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे,ओतूर पोलिसांच्या  या कारवाईचे परिसरात स्वागत केले जात आहे. 

     ओतूर पोलिसांच्या वतीने ओतूर पोलीस  स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करत असताना तब्बल ४९ चालक  दारू पिऊन वाहन चालवत होते अशा नशाबाज  चालकांवर ओतूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे, या कारवाईमुळे गतवर्षी  झालेल्या अपघातांच्या तुलनेत  यंदा अपघातांचे प्रमाण निम्याने घटल्याचे निदर्शनास येत आहे.गेल्या वर्षी महामार्ग व परिसरात छोटे मोठे एकूण  ३६ अपघात घडलयाची नोंद आहे  

 तर या वर्षी  केवळ १८ अपघात घडले आहेत तसेच  दारू पिऊन वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या तीन   चालकांवर कारवाई करण्यात आली होती  तर या वर्षी  ४९  वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.  सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शना खाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, हवालदार दत्ता तळपाडे, सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये यांनी केली असून अपघातांमध्ये   घट करण्यास यश मिळविल्याबद्दल ओतूर पोलिसांप्रती कौतुक व्यक्त केले जात आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु