कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आश्विच्या धनश्री गव्हानेनी मिळवीले ९४.६०% गुण



 संगमनेर /तालुक्यातील आश्वी येथील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द या विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला असून, कुमारी गव्हाणे धनश्री विकास, हीचा प्रथम क्रमांक आला आहे.

  धनश्रीला एकूण 94.60℅ एवढे गुण मिळाले आहे, तर शाळेच्या वतीने तिचा गुण गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे, गरीब परिस्थितीची जाण असलेली धनश्री ही अत्यंत हुशार असून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केला आहे, या कामी शिक्षकांकडून तिचा कौतुक केले जात आहे तसेच, आश्वी परिसरामध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माझा आदर्श घेऊन बाकीच्या मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावं, आणि चार माणसांमध्ये आपल्या आई-वडिलांना माणूस म्हणून  जगावं या साठी प्रत्येक मुलीने चांगलं शिकलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तर शिक्षणाचा चांगला उपयोग करावा, असं धनश्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु