कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जखणगांव च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेले भव्य सभागृह इतर गावांना प्रेरणादायी

 


जखणगांव च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेले भव्य सभागृह इतर गावांना प्रेरणादायी -जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ


आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर  येथील ७ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी सिद्धाराम  शालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावात मोठा सभामंडप नसल्याने नागरिकांना प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमास पैसे मोजुन मांडव द्यावा लागत असे.यंदा तर गावातील अखंड हरिनाम सप्ताहात पावसाने पहिल्याच दिवशी फजिती केली. मांडव फाटला.सरपंच डाँ. सुनिल गंधे यांच्या मार्गदर्शनाखालीच गावातील कारागीर व तरूणांची फौज  कामाला लागली व अवघ्या ५० तासात ५०००स्केअरफुट चा भव्य दिव्य बहुद्देशीय सभागृह उभारण्यात आला. हा गावात मोक्याच्या ठिकाणी असुन सर्व जातीधर्माच्या लोकांचा हा उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. आज याचे लोकार्पण माननीय जिल्हाधिकारी शालीग्राम सालीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, प्रांताधिकारी सुधीर पाटिल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुभाष लांगोटे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जखणगांव चे सरपंच डॉ. सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डीले, दत्ता वाळके, बाळासाहेब शहाणे, रमेश आंग्रे, अल्ताफ शेख, प्रवीण पानसंबळ, सुभाष सौदागर, डाँ. सुयश गंधे, भीमराज सौदागर, महेश चाबूकस्वार, दत्ता भीसे,अशोक कर्डिले,भाऊसाहेब कर्डिले, सहदेव वाबळे,रजनी गंधे, सुरेश कार्ले, मुजीब शेख,तात्या कर्डिले उपस्थित होते. यावेळी डाँ. सुनिल गंधे यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण आरोग्य ग्राम प्रकल्पाची माहिती पाहुण्यांना दिली. आरोग्य ग्राम हा अभिनव प्रयोग असुन जखणगांव मध्ये त्याचे चालू असलेले काम नक्की च वाखाणण्याजोगे आहे अशा भावना सर्वांनी व्यक्त केला.यावेळी मान्यवरांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन उबाळे यांनी केले तर महेश चाबूकस्वार यांनी आभार मानले.

जखणगांव मध्ये दोनच दिवसात लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे भव्य सभागृह हा जिल्ह्यात चर्चेचा व आश्चर्याचा विषय असुन लोकांमध्ये यामुळे जखणगांव चे नाव गाजत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु