कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहूरी तहसील कार्यालया समोर मुळा धरण प्रकल्पग्रस्त पीडित शेतकरी यांचे आमरण उपोषणाला यश

 


शेख युनूस अहमदनगर /..

केंदळ खुर्द चंडकापूर शिव रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी मुळा धरण प्रकल्पग्रस्त श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे,आशोक विठ्ठल दोंदे व पवार कुटुंब यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर येथे नऊ दिवस बेमुदत आमरण उपोषण केले त्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री राजाभाऊ आढाव यमुनाताई भालेराव व प्रहार जनशक्ती पक्षाची राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील बाबासाहेब मकसारे भारत जगधने मच्छिंद्र धावडे केंदळचे सरपंच उपसरपंच सदस्य नागरिक व इतर अनेक पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन या सर्व पिढीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.


मुळाधरण प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना साठ वर्षात रस्ता पाणी नाही हे मोठे दुर्दैव लांबे केंदळ खु-चंडकापुर शिव रस्ता खुला करुण मिळण्या बाबतचे उपोषण अखेर 9 व्या दिवशी-अभियंता सायली पाटील यांनी मला 8 दिवस द्या,मि शिव रस्ता वरील पाणी चारी अनाधिकृत असेल तर स्थळ निरीक्षण करुण सर्व चौकशी करुण उपोषण कर्ते सर्व पिडीत शेतक-यांना न्याय मिळवुण देईल असे लेखी आश्वास देऊन लिंबु पाणी शरबत देऊन 80 वर्षाच्या आंजी व ईतर सहा पिडीत शेतकरी 9 दिवस उपोषणास बसलेल्या श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे यांना मुळा पाटबंधारे विभागाच्या कर्तव्यदक्ष जिल्हा मुख्य अधिकारी अभियंता,सायली पाटील मॅडम यांच्या मध्यस्थीने सोडले 

यावेळी राहुरी तहसिल नायब तहसिलदार दंडिले मॅडम,सुनिलराव औटी साहेब,रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजुभाऊ आढाव,यमुनाताई भालेराव,प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष-श्री सुरेशराव लांबे पाटील,बाबासाहेब मकासरे,भारत जगधने,मच्छिदर धावडे,व ईतर शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु