कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी चिखलठाण येथे 1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न.

 


शेख युनूस अहमदनगर...राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी  चिखलठाण येथील डोंगराळ दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

    1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वतंत्र मिळाले मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता, भारत  स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्ण पणे वेगळा होता. हळूहळू देशातील राज्ये, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि  तेव्हा पासून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो.मंगल देशा, पवित्र देशा,कणखर देशा,दगडा च्या देशा,नाजूक देशा, फुलांच्या देशाची स्थापना ही तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते   स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त रोवली गेली.

महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जन जागृतीचे काम केले.कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 24 तास कामे करून घेतले  जात होते, या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र आंदोलन केले तेव्ह्यापासून 1मे रोजी कामगार दिन दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला.शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला असून महाराष्ट्र दिनाची  सविस्तर माहिती शिक्षकांनी दिली.

 या वेळी उपस्थित मुख्याधपाक रोडे सर, वायळ सर,काकडे  चांगदेव, दुधावडे सर,शिक्षक गाडेकर सर,काकडे सर, नरवडे मॅडम, बार्वे सर, बाचकर सर, सरोकते सर, तसेच शेरी अंगणवाडी शेख बिस्मिल्ला, काकडे मंगल, व अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख युनूस, आणि पालक वर्ग, विध्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु