कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

निघोज च्या माधुरीताई ढवळे यांचे देदीप्यमान यश

 


निघोज/ पारनेर - जीवनातील संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. त्याचा सामना करणारा यशस्वी होतो. तर पराभवाचा विचार करून संघर्षाच्या मार्गापासून लांब जाणारा व्यक्ती जीवनात आपले ध्येय गाठू शकत नाही.

  पारनेर तालुक्यातील निघोज येथील माधुरीताई सदानंद ढवळे यांनी पुण्यातील राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज या महाविद्यालयातून कायद्याचे पदवी (एलएलबी) परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून वकिली व्यवसायाची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचेकडील सनद प्राप्त केलेली आहे त्यांचे या यशामुळे निघोज परिसरातून त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

  निघोज येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ राजू भिकाजी ढवळे यांच्या या पत्नी असून श्री दत्तात्रय धोंडिबा देशमुख ( मंचर, ता. आंबेगाव, पुणे) यांच्या त्या कन्या आहे. विवाहा नंतर त्यांनी त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळवत सर्व महिला भगिनींसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे व ही बाब निघोज गावासाठी देखील अभिमानास्पद आहे.

त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या माहेर कडील मंडळी, सासर कडील मंडळी तसेच इतर नातेवाईक यांचा देखील खूप मोठा वाटा आहे.

घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करून दाखविले. प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे माधुरीताई ढवळे यांनी सिद्ध करून दाखवले.


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु