कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

भारत रत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

 


शेख  युनूस  अ.नगर /.. राहूरी तालुक्यातील पश्चिमला असलेल्या शेरी चिखलठाण  येथिल  जिल्हा प्राथमिक शाळा व शेरी अंगणवाडी  क्रमांक 60 या ठिकाणी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती मोठया  थाटामाटात  संपन्न करण्यात आली.सर्व प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.

या वेळी शिक्षक व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपले विचार व्यक्त केले त्यात त्या म्हणाल्या,भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे,सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले.देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.आताच्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातुन नाही तर पुस्तकातुन विचारात घ्यावे लागणार आहेत तरच त्यांच सार्वभोम राष्ट्रां स्वप्न साकार होणार आहे .

त्या नंतर गावचे लोक नियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  निमित्त  विनम्र आभिवादन  केले.ज्या पदावर आपण काम करतो ते केवळ सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी योगदान मुळेच त्यामुळे आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे एवढे  बोलून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले .                                    या वेळी उपस्थित अहमदनगर  जिल्हा पत्रकार शेख  युनूस, उपसरपंच काळनर आबासाहेब, राष्ट्रवादी युवक  कार्येकर्ते इसाक भाई  सय्यद, विनोद काळनर, संतोष  शेठ काळनर, धीरज  टेमकर, जमीर  सय्यद,शाळेतील  शिक्षक मुख्याध्यापक रोडे सर, काकडे  राजाराम सर, गाडेकर  ह.भ.प.महाराज सर, बारवे सर, बाचकर  सर, नरवडे  मॅडम, तसेच विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका सौ. मंगल  काकडे, मदतनीस सौ. बिस्मिल्ला शेख,आणि शेरी येथील जिल्हा परिषद  शाळेतील मुख्यध्यापक वायळ सर, दुधवडे सर, विध्यार्थी यांच्या उपस्थिती त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  जयंती  साजरी  करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु