कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेरी चिखलठाण येथे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

‌ 
संग्रहित छायाचित्र 

  शेख युनुस अहमदनगर - राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत हाताशी आलेली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

चिखलठाण हे बागायती क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटो टरबूज खरबूज,कांदा आणि गव्हाची पिके घेतली जातात.सध्या गव्हाची पिके सोंगण्याची तयारी जोरदार असून अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्थ झालेला आहे. टरबूज, खरबूज,टमाटे हि पिके सुध्दा या पावसामुळे व‌ सुसाट वाऱ्यामुळे फळे खराब होऊन झोडपलेली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून पिके उभारलेली असून आता तो या अवकाळी पावसामुळे पुर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे.

 संकटात सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

आबासाहेब काळनर (सामाजिक कार्यकर्ते)

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव भाव नाही त्यात अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली आहे.ग्रामपंचायत मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या मालाचा तपशील घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करून ग्राम सभा आयोजित करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव शासन दरबारी पाठवून शेतकऱ्याच्या पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करणार आहे 

आबासाहेब काळनर
 ( सामाजिक कार्यकर्ते )


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु