कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम.

 


संपादक - शेख  युनूस


     पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलने (ANM) प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. प्रथम वर्ष ए.एन.एम च्या महाराष्ट्र राज्य पॅरावैद्यक व सुश्रुषा मंडळ यांचे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यसह तर ४ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. कु. कोमल सुनील भोर ही ८४.२% मिळवून प्रथम, कु. आकांक्षा संपत गवळी ८२.७% मिळवून द्वितीय, कु. दीक्षा दीपक देठे ८१.७% मिळवून तृतीय व कु. माया नानासाहेब लोखंडे ८०.२% मिळवून विशेष प्राविण्यास उत्तीर्ण झाल्या आहेत तर कु. अपेक्षा खोसे,कु. निकिता खोसे कु. प्रियंका कसबे व कु. श्रद्धा जगदाळे या प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या आहेत.

      नर्सिंग स्कूलच्या स्थापनेपासून निकाल १००% लागत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलींना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक जागृती करिता नर्सिंग कोर्सचा फार मोठा हातभार लागल्याची माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डाॅ. सादिक राजे यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून जी.एन.एम हा पदविका अभ्यासक्रम पारनेर येथे सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला


 प्राचार्या मनीषा पंडित, शिक्षिका पूनम खोसे, शिक्षिका संध्या औटी यांचे मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त झाले. आमदार निलेशजी लंके साहेब, डॉ. सादिक राजे, डॉ. आर.जी.सय्यद, विश्वस्त फहाद राजे यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु