कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा चौकार

 


शेख युनूस अहमदनगर /. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या मार्गदर्शना खाली नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व 18 जागांवर दणदणीत विजय मिळाला.

 अहमदनगर बाजार समितीच्या निवडणुकीत सलग चौथ्यादा महाविकास आघाडीचे नेते जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांना अहमदनगर तालुक्यातील जनतेने नाकारले आणि कर्डीले व कोतकर गटाला 18 पैकी 18 जागा मिळवून दिल्या.

  माजी खासदार कै. दादापाटील शेळके अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी निवडणूक पार पडली.व्यापारी मतदार संघातील 2 जागा अगोदर बिनविरोध झाल्या होत्या.सुप्रिया ताई कोतकर, राजेंद्र बोथरा हे विजयी झाले.

शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली असून यात 99% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.कर्डीले व कोतकर गटाचे निलेश  सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सेवा संस्था, ग्रामपंचायत आणि सर्वसाधारण मतदान संघातील मतमोजणी होऊन सोसायटी आदी संस्था यात भाजपचे उमेदवार आघाडीवरच होते.

अहमदनगर तालूका कृषी बाजार समितीवर कर्डीले कोतकर गटाने बाजी मारत दणदणीत विजय मिळून महाविकास आघाडी ला पराभूत करून आपला  चौकार  मारला आणि अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु