कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

प्रहार जनशक्ती पक्षाचा पॅनल न होण्यासाठी प्रस्थापितांचे दबावतंत्र= सुरेशराव लांबे.

 


शेख युनुस अहमदनगर/..              

  कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी संचालक मंडळाची निवडणुक सन 2023/28 या कालावधीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुर्यभान उर्फ सुरेशराव दत्तात्रय लांबे पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातुन इतर मागास प्रवर्गामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांना सुचक श्री बाळासाहेब नानासाहेब लांबे तर अनुमोदन श्री राजाराम भाऊ लांबे हे होते यावेळी पिंपरी अवघड सरपंच पती श्री बादशाह वजीर शेख व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

यावेळी लांबे पाटील यांना विचारले असता त्यांनी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपुर्ण पॅनल तयार केलेला असुन आमच्या पॅनेलचा विजय निश्चित आहे आम्ही ही निवडणूक कांदा उत्पादक शेतकरी व इतर भुसारमालाला योग्य भाव मिळण्यासाठी व शेतकऱ्यांची मार्केट कमिटी पदाधिकारी यांच्या मार्फत व्यापाऱ्याकडुन होणारी लुट थांबवण्यासाठी व शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देण्यासाठी ही निवडणुक लढवत आहे सर्व शेतकरी मतदारांचा आम्हाला पाठिंबा आहे असे प्रतिपादन उमेदवारी अर्ज दाखल करता वेळेस शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केले.



  आमच्या अनेक उमेदवारांवर या प्रस्थापित पुढाऱ्यांनी दबाव टाकुन त्यांना अर्ज भरन्यापासुन परावृत केले आहे तरीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असुन त्यातील अनेक उमेदवारांनी आम्हाला तुमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनल मधुन उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,यावेळी त्यांना छाननीनंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अर्ज छाननी नंतर अर्ज मंजुर झालेल्या उमेदवारांवर प्रस्थापित पुढा-यांकडुन विविध दबावाचे प्रयत्न होतील तरीही कुनाच्या दबावाला बळी न पडता माझ्याशी संपर्क करा व या निवडणुकीत सर्वसामान्य नेतृत्वाच्या व उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभे राहुल शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्या अशी विनंती करुन आव्हान प्रहार चे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव यांनी केले आहे.              ‌    

सुरेशराव लांबे म्हणाले कि,मा. राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू साहेब यांचा आदेश आला तरच योग्य जागा घेऊन इतर मंडळाबरोबर युती होईल अन्यथा प्रहार स्वतंत्र लढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु