कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहुरी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले! तालुक्यातील असंख्य नागरिकांचे छत हरपले

 


प्रतिनिधी - शेख  युनूस अहमदनगर


 राहुरी / तालुक्यासह अनेक पूर्व भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. 


सविस्तर वृत्त असे की सर्वत्र ऋतूंमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडून शेतकऱ्यांचे जगणे निसर्गाने मुश्किल केले आहे. शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता नाकी नऊ आले आहे. अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास आज निसर्ग हिसकावून घेत आहे. काल झालेल्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रमी वाऱ्या वादळासह रस्त्यांवरती वृक्ष कोलमडले आहेत. मोठ्या वाऱ्या वावधानासह शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या घरांची छते उडून गेली आहे. 

अनेकांचा निवारा उडून अनेक जण बेघर झाले आहेत. असंख्य नागरिक निसर्गाच्या कोपामुळे हंबरडा फोडत आहे. दोन तासाच्या विक्रमी वादळ वाऱ्यासह नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकविलेले शेतीमाल या निसर्गाच्या कोपामुळे मातीहीन झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज  घेऊन कशीतरी आपली पिके उभी करून आपली उपजीविका भागवत असताना निसर्ग शेतकऱ्याला जगू देईना.

अनेक नागरिकांची घराची छते उडून गेली आहे. अशाप्रकारे राहुरी तालुक्यातील  अनेक गावात शेतकऱ्यांचं नागरिकांचे कालच्या झालेल्या वाऱ्या वादळाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात न भरून येणारे नुकसान झाले आहे. नागरिकांनी  सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु