कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा शुभारंभ

 



*शेख  युनूस अहमदनगर*/.


काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते कोल्हार भगवतीपुर येथे राहता तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा प्रचार शुभारंभ संपन्न झाला. सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्र आणि सत्तेच्या गैरवापराविरोधातील ही लढाई आहे, आता परिसरातील जनतेला गृहीत धरून, दादागिरी करून, दमदाटी करून, आजवर जे राजकारण केलं त्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे असे थोरात साहेबांनी यावेळी सांगितले.


राहाता तालुक्यातील मतदार मोठ्या प्रमाणावर दहशत आणि दादागिरी झुगारून या सभेला उपस्थित होते. 


राहाता तालुक्यातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असे बहुतांश वक्त्यांनी यावेळी सांगितले. 


पारनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार निलेश लंके यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकारी संस्थांच्या कामाची पोचपावती दिली. राज्यात ज्या संस्था चांगल्या चालतात त्यात संगमनेरच्या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असेही त्यांनी सांगितले.


शिवाय बाळासाहेब थोरात शांत दिसत असले, तरीही अंगावर येणाऱ्याला शिंगावर कसं घ्यायचं हे त्यांना पक्क माहित आहे. थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन राहाता तालुक्यातील दहशतीचा करेक्ट कार्यक्रम करू असे त्यांनी सांगितले.


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप यावेळी आवर्जून उपस्थित होते. विद्यमान पालकमंत्र्यांच्या रंग बदलण्याच्या प्रवृत्तीचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी माजी आमदार डाॅ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, डाॅ. एकनाथ गोंदकर, सौ. प्रभावती घोगरे यांसह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व राहाता तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु