कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

चिखलठाण येथे रमजान ईद (ईद उल फित्र)मोठ्या उत्साहात संपन्न

     


  शेख  युनूस अहमदनगर/.. राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण  येथे  रमजान ईद मोठ्या थाटामाटात व शांततेत संपन्न करण्यात आली.

  रमजान ईद ही मुस्लिम बांधवासाठी वर्षातील एक मोठा  सण  मनाला जातो. मुस्लिम बांधवासाठी वर्षाचे बारा महिने त्यातील नववा महिना म्हणजे रमजान ईद ईद  उल फित्र होय.

   रमजान  ईद  सणाची  सुरुवात ही चंद्र  दर्शनानं होते. रोजा म्हणजे रमजान व्रत एक महिना उपवास ठेवण्यात येतात. मुस्लिम बांधव, लहान, मोठे, आबाल व्रद्ध हे रमजानचे  रोजे करतात. रोजे हे सूर्योदया पासून ते सूर्योस्ता पर्यंत मुस्लिम बांधव काहीच खात पीत नाही. निर्वेसनी राहून उपवास रोजे ठेवतात. रमजान महिन्यात रोजे ठेवले म्हणजे माणसाची सर्व पापे, गुन्हे जळून जातात असे मानले जाते.

   रोजांची  सांगता रमजानच्या ईद  सणाच्या दिवशी होते. रोजामुळे आरोग्याचा विचार तर  आहेच शिवाय वर्षभर आपले  आचार  विचार, संयमीत पवित्र राहावेत यासाठी रोजे असतात. गोरगरीबाची  भूक  काय असते याची प्रत्येक मनुष्याला जाणीव असावी हाही एक हेतू या उपवासाच्या मागे असतो.

 संपूर्ण महिना उपवासाच्या रोजाच्या पवित्र बंधनात राहून महिन्याला निरोप देताना एक महिना सत्कर्म करायची संधी अल्ल्हाने प्राप्त करून  दिली.

  रमजानची रोजे उपवास संपताच दुसऱ्या दिवशी ईद म्हणजेच ईद उल फित्र साजरी करण्यात येते. ईद उल फित्रच्या दिवशी नमाज  पठण करण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिम बांधवाने विशेषतः श्रीमंतानी आपल्या मिलकतीचा काही भाग बाजूला काढून तो गरीब, गरजूना द्यान्यात येतो. रमजान ईद च्या दिवशी नमाज  झाल्यावर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलीगन गळा भेट  देतात. घरोघरी जाऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देतात तसेस  शीरखुर्मा, गुलगुले, गोड प्रसाद एकमेकांना खाऊ  घालतात.

  रमजान ईद हा सण संयम, समानता, दया, करुणा, प्रेम, यांचा संदेश देणारा सण आहे.

यावेळी उपस्थितीत हाजी गणिभाई, मौलाना नासीर भाई, हाजी जमालभाई, हाजी खालीलभाई, मोहंमद भाई, अकबर भाई, बाबाजान शेख, मौलाना उबेदभाई, मौलाना मुसाभाई, सादिकभाई  बोर्डी बिल्डर, जुबेर भाई, रफीक शेठ  शेख  चिकन, जावेद भाई, फारूकभाई, जैनुभाई, सकीलभाई, बाबुलाल शेख  साहेब, सय्यद शेख, राष्ट्रवादी तालूका युवक कार्यकर्ते इसाक सय्यद, सलमान सय्यद,अहमदनगर पत्रकार युनूस शेख, नदीम शेठ, आसिफ  शेख, नाजीम भाई आदी मुस्लिम बांधवांच्या  उपस्थितीत तसेच  राहूरी पोलीस निरीक्षक डांगे साहेब यांच्या  संपर्कात भ्रमनध्वनी द्वारे चिखलठाण  येथे रमजान ( ईद उल फित्र)मोठया थाटामाटाततसेच  शांततेत संपन्न करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु