कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

वरवंडी गावची व शिवसेनेची बुलंद तोफ कैलास पाटोळे यांचे दुःख द निधन

 


                               शेख  युनूस  अहमदनगर/..

संगमनेर / तालुक्यातील वरवंडी येथील  कैलास पाटोळे यांचे रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुःखद  असे निधन  झाले.      

   कैलास पाटोळे हे संगमनेर तालुक्यातील कट्टर शिव सैनिक  असून ते पिंपळगाव देपा गणा चे  गणप्रमुख  होते. कैलास पाटोळे यांच्या अचानक  जाण्याने वरवंडी तसेच संगमनेर तालुक्यातील जनतेवर  दुःखाचा डोंगर  कोसळला आहे.कैलास पाटोळे हे शिवसेनेची  बुलंद तोफ व एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याने शिवसेनेचा वाघ हरपला  असल्यामुळे नातेवाईक, मित्र परिवार, आणि  कुटुंबावर  फार मोठ्या प्रामानावर दुःखाचा  डोंगर  कोसळलेला आहे.                                   

कैलास  पाटोळे यांच्या धाडसी व मोठया योगदाना मुळे संगमनेर तालुक्यात आगळी  वेगळी  ओळख  निर्माण होऊन शिवसेना बळकट झाली होती. कैलास पाटोळे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, आणि  दोन मुले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु