कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ संपन्न

 पोलीस निरीक्षक घनश्याम  बळप यांचा निरोप समारंभ संपन्न


पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ चार मार्चला पारनेर तालुका पोलीस स्टेशन आणि पत्रकार बांधवांच्या आयोजकांच्या उपस्थित पार पडला


अत्यंत हुशार व्यक्तिमत्व म्हणून पोलीस निरीक्षक यांची ओळख आहे, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी पारनेर तालुका पोलीस स्टेशन येथे कारभार बघितला असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घनश्याम बळप यांच्याकडे पाहीले जात होते, तर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये  अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या  बदल्या करण्यात आल्या . पारनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व आवैद्य धंदे, तसेच दारू वाळू, चोर यांना चांगल्या प्रकारे घनश्याम बळप यांचा धाक होता. तर त्यांची बदली झाल्याने पारनेर तालुक्यातील  जनता भावनिक झाली होती. यापुढे देखील मी चांगलंच काम करणार असून, गोर गरीब जनतेला योग्य तो न्याय देईल, आणि आरोपींना चांगलाच धडा शिकवेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिले.


तर त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी.नगरसेवक विजुभाऊ औटी, महिला आघाडीच्या शिवसेना तालुकाप्रमुख प्रियंका ताई खिल्लारी, एडवोकेट अमित धुळगंड, तसेच पारनेर तालुक्यातील युवा नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु