कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

चिखलठाण परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय साहित्याची चोरी

 


अहमदनगर प्रतिनिधीं /शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील म्हसकोबा वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी करून पोबारा केला.        


                                  ‌  

 सविस्तर माहिती अशी कि म्हसकोबा वाडी येथे  इयत्ता 1 ते  4 पर्यंत शालेय विद्यार्थी हे वाडी वस्तीवरून येऊन शिक्षण घेतात. शाळेसाठी माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या निधीतून कॅम्पूटर मोनीटर, माऊस,संपूर्ण सटसह साहित्य दिले होते,या कॉम्पुटर द्वारे येथील विद्यार्थी शालेय शिक्षणाची माहित घेत होते त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने  योग्य मार्गदर्शन होत होते. रविवार दि. 26 मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी शाळेतील संगणक साहित्य चोरून पोबारा केला .शिक्षक शाळेच्या वेळेनुसार शाळेत आले असता त्यांना शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडल्याचे लक्षात आले त्या अंदाजावर त्यांनी चोरी झाल्याचे लक्षात आले असता तेथील शिक्षक मुख्याध्यापक डोमाळे बाळासाहेब यांनी तात्काळ सरपंच यांना फोनद्वारे शाळेतील चोरीची माहिती दिली असता त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क करत म्हसकोबा वाडी शाळेच्या चोरीच्या तपासासाठी पंचनामा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल केला असून राहुरी येथील पोलीस निरिक्षक डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल खेमनर ,सानप,हे करत आहे. 

सदरील घटनेमुळे शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा‌ अशी मागणी जोर धरत आहे. यापुर्वी म्हसकोबा वाडी येथे नाथ म्हस्कोबा मंदिरातील साहित्य हे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते त्या चोरीचा तपास लागण्यापूर्वी च याच ठिकाणी पुन्हा शाळेत चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलीसांना आव्हान केल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु