कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांची बदली

 अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची अहमदनगर येथे बदली.



पारनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ऐवद्य धंद्यावरती, तसेच वाळू गौण खनिज यांसारख्या धंद्यावरती पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा वचक होता.

तर त्यांच्या कायद्याचा धाक हा पारनेर तालुक्यातील जनतेला मोठा होता, नगर जिल्ह्यातील एक नावाजलेले अधिकारी पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे बघितले जात. गोरगरीब जनतेवर होणारे अन्याय, यावर त्यांचा मोठा वचक होता. तर पोलीस अधीक्षक राकेश ओला सर यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या पार पडल्या असून पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली अहमदनगर जिल्हा येथे करण्यात आली आहे.

प्रतिनिधी - रमजान शेख 

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु