कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

गणपतराव हजारे आदर्श सरपंच पुरस्काराने होणार सन्मानित

 संगमनेर तालुक्यातील पानोडी गावचे आदर्श सरपंच गणपतराव हजारे  हे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित होणारा असल्याने पंचक्रोशीच्या वतीने त्यांचे अभिनंदन तसेच स्वागत करण्यात येत आहे,


सरपंच गणपतराव हजारे हे गोरगरिबांचे नेहमी मदतीसाठी सातत्याने पुढे असतात, गावच्या विकासासाठी त्यांचा सर्वात मोठा वाट आहे, तर येणाऱ्या आठ मार्चला सिनेमा अभिनेत्री अलका कुबल यांच्या शुभहस्ते अहमदनगर येथे त्यांना आदर्श पुरस्कार मिळणार असून, गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.गणपतराव हजारे हे शिक्षक असून अत्यंत हुशार व्यक्ती महत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात, तर येणाऱ्या अडचणींना ते नेहमी सामोरे जात गोरगरिबांच्या मुला मुलींच्या कामा संदर्भात त्यांचा पाठपुरावा असतो.

तर सरपंच गणपतराव हजारे यांना पंचक्रोशी च्या वतीने त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधीरमजान शेख मांडवे बुद्रुक.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु