कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

माहुली घाटात मालवाहू कंटेनर पलटी : एकजण जखमी

 


संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात चालकाचे कंटेनरवरील  नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाल्याची घटना रवीवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर चालक वाजीद खान हा संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने त्याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एन एल ०१ ए एफ २९६६ हा घेऊन चालला होता दरम्यान तो माहुली परीसरातील घाटात आला असता त्याचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गालगत असणार्या साईड गटारीत पलटी झाला.यात कंटेनरचे नुकसान झाले तर वाजीद खान हा किरकोळ जखमी झाला.



दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ व टोल प्रशासनाने धाव घेतली रुग्णवाहिका चालक नागेश भोर व प्रवाश्यांनी जखमी खान याला तातडीने मदत करत रुग्णालयात हलवीले.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु