कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ...

 


बोटा/ सतिश फापाळे 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा परीसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची घटना सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री  घडली आहे.


याबाबत मिळालेल्या  माहितीनुसार पुणें नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील विद्यानिकेतन महाविद्यालय परीसरात भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना दोन वर्षीय तरस मादीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या झालेल्या  अपघातात तरस मादी जागीच ठार झाली आहे.


    सदर घटना घारगांव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले यांच्या लक्षात येताच त्यांनी वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना याबाबतची माहिती दिली, माहिती समजताच ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ,दिपक वायळ आदी  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरस मादिस कोठे गावच्या रोपवाटीकेत नेले.


     दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वनक्षेत्र असल्याने भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अनेक बिबटे,तरस, वन्य  प्राण्यांचा अपघात होऊन ठार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.या वन्य प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी महामार्गाच्या कडेला विविध उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी प्राणीमित्र करत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु