कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पुणे_नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात.

 


भरधाव वाहणाने १८ महिलांना चिरडलं.

५ ठार तर १३ गंभीर


सतिश फापाळे 


          पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला असून, एका भरधाव वाहणाने खरापुडी फाट्याजवळ महिलांच्या घोळक्याला उडवल आहे. तर या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १३ महिला जखमी झाल्या आहेत.जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.या घोळक्यात १८ महिला होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.


    खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या १८ महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या महिला आल्या होत्या. मंगल कार्यालय दुसऱ्या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्या सर्वजणी रस्ता ओलांडत असताना पुण्याहून आलेल्या एका अज्ञात भरधाव  वाहनाने या १८ महिलांच्या घोळक्याला जोरात धडक दिली.     


         या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी तातडीने मदत पुरवल्याने महिलांना लवकर उपचार मिळाले आहे.येथील नागरिकांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु