कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगावात साठ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या.

 


संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगांवातील गावठाण परीसरात राहत असलेल्या  साठ वर्षीय व्यक्तीने राहत्या भाडोत्री खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

       याबाबत घारगांव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की  एकनाथ शंकर शिंदे (वय वर्ष ६०) हे घारगांवातील  गुलाब नबी शेख यांच्या भाडोत्री खोलीत  राहत होते. दुपारी त्यांच्या पत्नी जिजाबाई मेडीकलमधून गोळ्या औषधे आणण्यासाठी बस स्टॅण्डवरती गेल्या होत्या.त्या गोळ्या_औषधे घेऊन परत आल्या असता त्यांना घरात त्यांचे पती एकनाथ शिंदे यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने सिलींग फॅनला गळफास घेतला असल्याचे चित्र दिसले. हे चित्र पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला.जिजाबाई यांचा रडण्याचा आवाज ऐकून आजुबाजुच्या नागरीकांनी घटना स्थळावर धाव घेतली.

ग्रामस्थांनी या विषयीची माहिती घारगांव पोलिसांना दिली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पो. हे. कॉ. राजेंद्र लांघे, संतोष खैरे, किशोर लाड आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  शिंदे यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.दरम्यान छाया भोसले यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहेत 

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु