कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बोरबन येथे पार पडणार त्रिदिनात्मक मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन येथे १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी रोजी त्रिदिनात्मक गणपती, ग्रामदैवत मारुती व साईनाथ महाराज या देवांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे .

दरम्यान बुधवारी सकाळी घारगांव बसस्थानकापासून मुर्तींच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला असून असंख्य महीलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाल्या तर लेझीमच्या डावाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर महीलांनीही फुगडीचा आनंद घेतला. व ही मिरवणूक हळूहळू  बोरबन गावच्या दिशेने मार्गस्थ झाली.



 तर आज सायंकाळी ७ वा ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे. तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी प्रायश्चित्त विधी,मंडल देवता स्थापना,जलाधिवास, मुर्तीस्थापन विधी,हवन, मुर्तीशय्याधिवास आदि कार्यक्रम पार पडणार असून सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.केशव महाराज हगवणे ( देहु) यांचे हरी किर्तन होणार आहे.व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडणार आहे तर सकाळी ९ वाजता ह.भ.प. उमेश महाराज दशरथे ( आळंदी) यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले  आहे.

तर या सर्व कार्यक्रमांसाठी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बोरबन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु