कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय काशिनाथ गाडेकर हे शेतकरी माहुली येथील रहिवासी असून घरापासून काही अंतरावर त्यांची विहीर आहे. गुरवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या विहीरीतील मोटारीचा पाईप कापून मोटार व खोक्यातील स्टार्टरची चोरी करून पोबारा केला आहे. गाडेकर यांचा मुलगा चेतन हा पाणी भरण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. दरम्यान गाडेकर यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी नवीन मोटार खरेदी केली होती.आणि त्यात आता शेतीचे चालू पाणी बंद झाल्यामुळे गाडेकर यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
दरम्यान आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यात शेतीही पडीक ठेवता येत नसल्याने अनेक शेतकरी कर्ज उचलून शेती करत असतात. त्यात अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात आणी अश्या प्रकारच्या चोऱ्या झाल्यानंतर मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहेत. पठार भागातून अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल, मोटार, केबल, स्टार्टरच्या चोऱ्या झालेल्या आहेत.यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.परंतू या चोरांचा तपास अजून घारगांव पोलिसांना लागत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोऱ्यांचा तपास लाऊन चोरटे जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Comments
Post a Comment