कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

विहीरीतील पाणबुडी मोटारीची चोरी

 



संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील खालची माहुली परीसरातून विहीरीतील पाणबुडी मोटार व स्टार्टरची चोरी झाल्याची घटना गुरुवार दिनांक २६ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय काशिनाथ गाडेकर हे शेतकरी माहुली येथील रहिवासी असून घरापासून काही अंतरावर त्यांची विहीर आहे.  गुरवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या विहीरीतील मोटारीचा पाईप कापून मोटार व खोक्यातील स्टार्टरची चोरी करून पोबारा केला आहे.  गाडेकर यांचा मुलगा चेतन हा पाणी भरण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. दरम्यान गाडेकर यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी नवीन मोटार खरेदी केली होती.आणि त्यात आता शेतीचे चालू पाणी बंद झाल्यामुळे गाडेकर यांना डोक्याला  हात लावण्याची वेळ आली आहे.

 दरम्यान आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यात शेतीही पडीक ठेवता येत नसल्याने अनेक शेतकरी कर्ज उचलून शेती करत असतात.  त्यात अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात आणी अश्या प्रकारच्या चोऱ्या झाल्यानंतर मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहेत. पठार भागातून अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल, मोटार, केबल, स्टार्टरच्या चोऱ्या झालेल्या आहेत.यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.परंतू या चोरांचा तपास अजून घारगांव पोलिसांना लागत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोऱ्यांचा तपास लाऊन चोरटे जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु