कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

 


  संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे भर दिवसा शेतात गवत कापत असताना महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. शकुंतला शंकर मैड (वय ५५) रा. दरेवाडी असे जखमी महिलेचे नाव आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड या वास्तवास आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शकुंतला मैड घरापासून काही अंतरावरील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतावरील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शकुंतला मैड यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने शकुंतला यांच्या दोन्ही हाताला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले आहे. यावेळी शकुंतला यांनी जोरजोरात आरडा ओरडा केल्याने आजुबाजुचे नागरिक धावत आले. त्यानंतर बिबट्याने तेथूनच धूम ठोकली. शकुंतला यांना तातडीने जखमी अवस्थेतच उपचारासाठी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यांवर उपचार करण्यात आले परंतू  त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 दरम्यान, सोमवारी दुपारी जांभूळवाडी येथील सटवा राणबा खेमनर यांच्या बकरावर हल्ला करत ठार केले. बिबट्याचा संचार भरदिवसा वाढत असून नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु