कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

चिखलठाण येथे शनीअमावस्येच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

 



शेख युनुस   


राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ व दुर्गम भागातील शेरी चिखलठाण येथे शनी अमावस्येच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  भारत देशात शनी अमावस्येला विशेष महत्व समजले जात असून या  भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शनी शिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने जातात व शनी देवाचे दर्शन घेतात.

                              

चिखलठाण येथील काही युवक तरूण कार्यकर्त्यांनी शनी अमावस्येच्या निमित्ताने चिखलठाण येथे कबड्डी, खो खो खेळाचे आयोजन करून खेळाचे महत्व समजून देत स्वस्थ आरोग्य ,निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम व खेळाला महत्व देण्याचे आव्हान करत खेळाडूंचे आभार सामाजिक कार्यकर्ते  जमीर सय्यद यांनी मानले.            ‌    शनी अमावस्येच्या निमित्ताने  रुपेश  महाराज नाईकवाडी शिंदोडीकर यांची भव्य किर्तन सेवा संपन्न झाली . यावेळी उपस्थित रुपेश नाईकवाडी महाराज म्हणाले कि पशू पक्षावर प्रेम करा,आई वडिलांची सेवा करत  आई वडिलांचे उपकार विसरू नका. संत बाळूमामा यांनी आपल्या मनुष्य प्राण्यांपेक्षा पशू,प्राण्यांवर केले होते.मुक्या प्राण्यांना जीव लावा  आदी गोष्टींचा विचार करत एकता जपावी,बंधू प्रेम, मित्र प्रेम, सगे सोयरे ,कुटुंबाला सुखाची सावली देत परमार्थ करत देवाचे स्मरण करावे. किर्तन व खो खो खेळाची सांगता झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी  उपसरपंच आबासाहेब काळनर,रामा काळनर,राहुल बाचकर, सोनू बाचकर,धीरजभाई टेमकर,साहेबराव बर्डे, दगडू खेमनर,शिवाजी आहेर,रशीद सय्यद ,येशू पाटील काळनर,जानकू काळनर,महादू काळनर,शिवसेना युवक कार्यकर्ते सुभाष बाचकर यांसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु