कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनुस
राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ व दुर्गम भागातील शेरी चिखलठाण येथे शनी अमावस्येच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत देशात शनी अमावस्येला विशेष महत्व समजले जात असून या भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शनी शिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने जातात व शनी देवाचे दर्शन घेतात.
चिखलठाण येथील काही युवक तरूण कार्यकर्त्यांनी शनी अमावस्येच्या निमित्ताने चिखलठाण येथे कबड्डी, खो खो खेळाचे आयोजन करून खेळाचे महत्व समजून देत स्वस्थ आरोग्य ,निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम व खेळाला महत्व देण्याचे आव्हान करत खेळाडूंचे आभार सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद यांनी मानले. शनी अमावस्येच्या निमित्ताने रुपेश महाराज नाईकवाडी शिंदोडीकर यांची भव्य किर्तन सेवा संपन्न झाली . यावेळी उपस्थित रुपेश नाईकवाडी महाराज म्हणाले कि पशू पक्षावर प्रेम करा,आई वडिलांची सेवा करत आई वडिलांचे उपकार विसरू नका. संत बाळूमामा यांनी आपल्या मनुष्य प्राण्यांपेक्षा पशू,प्राण्यांवर केले होते.मुक्या प्राण्यांना जीव लावा आदी गोष्टींचा विचार करत एकता जपावी,बंधू प्रेम, मित्र प्रेम, सगे सोयरे ,कुटुंबाला सुखाची सावली देत परमार्थ करत देवाचे स्मरण करावे. किर्तन व खो खो खेळाची सांगता झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसरपंच आबासाहेब काळनर,रामा काळनर,राहुल बाचकर, सोनू बाचकर,धीरजभाई टेमकर,साहेबराव बर्डे, दगडू खेमनर,शिवाजी आहेर,रशीद सय्यद ,येशू पाटील काळनर,जानकू काळनर,महादू काळनर,शिवसेना युवक कार्यकर्ते सुभाष बाचकर यांसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment