कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

लोहार कारागीराची मुलगी महाराष्ट्रात पहीली

 



साकुरची तरुणी महाराष्ट्रात पहिली

संगमनेर / तालुक्यातील साकूर येथील कु. मनिषा सिताई बबन भालके हिने गेल्या डिसेंबर महिन्यात लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पार पडलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मनिषा हीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 


लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात लोहार समाज - दशा आणि दिशा या विषयावर राज्य स्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कु मनिषा सिताई बबन भालके हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सौ माधूरी गणेश थोरात यांनी द्वितीय व नगर जिल्ह्यातील राहुरी येथील सौ.अनुराधा ज्ञानेश्वर इघे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

विजेत्यांना दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी भोसरी येथील गोविंद गार्डन कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात ट्रॉफी व रोख रक्कम ,पारितोषीक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तर मनिषा हीचे या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु