कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

तीन आरोग्य केंद्रांना शासनाचा कायाकल्प पुरस्कार.

 


ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र कायाकल्प पुरस्कारात जिल्ह्यात प्रथम.

विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्र प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कार.

ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक.


अकोले / सतीश फापाळे 


       अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा, विठा , म्हाळादेवी या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी नागरिकांना स्वच्छ, संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरनात आरोग्य सुविधा देत,आपल्या कामात सातत्य ठेवून सन २०२१_२२ या कालखंडात केलेल्या उत्तम कामगिरीतून ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राला जिल्ह्यात शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाचे नामांकन झाले .तर विठा,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे.


     शासनाकडून निर्धारित केलेली मानक पूर्ण करून ब्राम्हणवाडा,विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राने स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रित करत या कामात सातत्य ठेवून नागरीकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरनात उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या आहेत. येथील आरोग्य आधीकारी तसेच कर्मचारी ,आशा सेविका यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार व विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राने प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला आहे.या पुरस्काराने ब्राम्हणवाडा,विठा ,म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या उत्तम प्रतीच्या सेवेचा आदर्श जिल्ह्यात निर्माण केल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

      


     सन २०२१_२२ साठी अहमदनगर जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन हे राज्य स्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार केलेल्या चेकलिस्ट प्रमाणे करण्यात आले होते. यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कारात प्रथम क्रमांक तर विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागात उल्लेखनीय प्रगती होत असून आरोग्य आधीकारी ,कर्मचारी यांचे मार्फत उत्तम कामगिरी बजावली जात असल्याचे दिसून येतं आहे.



देशात महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली.नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात.तसेच या संस्थांमधील आरोग्य आधीकारी आणि कर्मचारी यांनी या कामामध्ये सातत्य ठेवावे.तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविली जात आहे.यामध्ये तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये मानधन तसेच मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळणारं आहे.तसेच विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कार मिळाल्याने प्रति पन्नास हजार रुपये मानधन ,मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळणारं आहे.


      यादरम्यान अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड,रा.काँ.सचिव सचिन नरवडे,मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर,जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.सांगळे तसेच पठार भागतील सरपंच सुभाष गायकर,नितीन डुंबरे, प्रनेश शिंगोटे, बाळासाहेब फापाळे,योगेश महाले ,ज्योतीताई जगताप,संगीता महाले,पो.पाटील शिवाजी फापाळे,भगवान काळे,राहुल लांडे, राजेन्द्र गवांदे,सुभाष लांडगे,कमलेश गांधी,निलेश गवांदे, डॉ .योगेश फापाळे सुरेश फापाळे,विकास महाले,प्रदीप पवार,इंजी.संतोष फापाळे बजरंग दल ब्राम्हणवादा पठार भागातील आदी ग्रामस्थांनी ब्राम्हणवाडा , विठा,म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी व ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचे डॉ. भारत ताले, डॉ.सोनवणे .बी. टी. कर्मचारी व आरोग्य सेवक,सेविका तसेच आशा सेविका यांचे तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करत केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे 



 ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्रात गेली पाच वर्षापासून इथे वैद्यकिय आधिकारी म्हणून कार्यरथ आहे.तसेच डॉ.सोनवणे .बी .टी देखील वैद्यकिय आधीकारी साथ देत आहेत.या केंद्राच्या कार्यक्षेत्रात १७ गावे १४ ग्रामपंचायती असून यात  ७ उपकेंद्र नागरिकांना आरोग्य सेवा देत आहे.यात २ वैद्यकीय आधीकारी,७ सिएचओ,३५ कर्मचारी,आशासेविका यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.यां सर्वांचे सहकार्याने आणि उत्तम प्रतीच्या कामगिरीने आम्ही शासनाच्या कायाकल्प पुरस्कारात जिल्ह्यात हे आरोग्य केंद्र प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.याचे सर्व श्रेय गावागावात काम करणारे कर्मचारी आशा सेविका आणि आधीकारी तसेच लोकप्रतिनधींकडून मिळालेलं सहकार्य यांचे असून येथील नागरिकांचे, समाजसेवक यांचे सहकार्य देखील मोलाचे आहे.आम्हाला पुरस्कार जाहीर झाल्याने नक्कीच आनंद द्विगुणित झाला आहे.आधीक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.यापुढे देखील उत्तम प्रतीच्या सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर राहू.अशीच आरोग्य सेवेत दिवसेंदिवस प्रगती करत राहू.आणि नागरिकांना सर्व सुविधा येथे उपलब्ध करू.यापुढील पुरस्कारासाठी देखील प्रयत्नशील आहोत.

डॉ. भारत ताले.

वैद्यकिय आधिकारी ब्राम्हणवाडा.



अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील आरोग्य केंद्राने कोविड कालखंडात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यात या आरोग्य केंद्रास सन २०२१_२२ च्या कायाकल्प पुरस्कारात अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कारसाठी नामांकन झाले व विठा,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कारसाठी नामांकन झाल्याने अकोले तालुक्यातील आरोग्य विभागांत उत्तम प्रकारची प्रगती होत असून चांगली सेवा मिळत आहे.या आरोग्य केंद्रानी उत्तम प्रतीची कामगिरी केली आहे.ब्राम्हणवाडा येथील वैद्यकीय आधीकारी डॉ भारत ताले,डॉ.सोनवणे बी. टी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांचे अभिनंदन करतो.ब्राम्हणवाडा,विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्रांचा तालुक्यातील इतर आरोग्य केंद्र,उपकेंद्र यांनी आदर्श घ्यावा.आणि नागरिकांना चांगल्या प्रतीची सेवा देत उत्तम कामगिरी बजवावी.काही अडी अडचणी असल्यास संपर्क करावा.तालुक्यातील नागरिकांचे निरोगी आरोग्य ठेवण्यास आपला सर्वांचा मोलाचा वाटा आहे.अशीच यापुढे देखील आरोग्य विभागात प्रगती होत राहील.आपले सर्वांचे साथीने असेच पुरस्कार तालुक्यात येत राहतील हीच अपेक्षा व्यक्त करतो.

डॉ किरण लहामटे 

आमदार 



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु