कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, यांच्या श्रमदानामुळे खेड्यांचा विकास करता येतो खेडे विकासाच्या दृष्टीने समृद्ध झाल्यास देश सशक्त बनेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी केले. ते रमेश फिरोदिया कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि.3 जानेवारी 2023 ते सोमवार दि. 9 जानेवारी 2023 या कालावधीत हिवरगाव पठार ता.संगमनेर येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कु. सुप्रियाताई मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वनवे, यादव नागरे, माधवराव डोळझाके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब नरवडे, देवराम नागरे, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप, उपप्राचार्य प्रा.रणजीत गिरी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा संगमनेर तालुका विभागीय समन्वयक प्रा म्हतू खेमनर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच कुमारी सुप्रियाताई मिसाळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यात व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वात मोठा वाटा आहे. मला सुद्धा या शिबिराचा खूप मोठा फायदा झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले ,ते म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे व समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे.
या सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवक ग्राम स्वच्छता ,वृक्षारोपण व जलसंधारण युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास, हुंडाबंदी विषयक जनजागृती, महिला सबलीकरण व सक्षमीकरण,नव मतदार नोंदणी व जनजागृती, पर्यावरण पूरक पर्यटन, गावाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, शाश्वत सर्वांगीण विकास, नदी स्वच्छता, जैवविविधता सर्वेक्षण व गावाचा इतिहास, प्रबोधन पथनाट्य, शिवार फेरी इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे असे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी सांगितले.
या श्रमसंस्कार शिबिरास संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शंकरराव पा. खेमनर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दीपकजी फिरोदिया, महिला व बालकल्याण समिती अहमदनगर अध्यक्ष मीराताई शेटे प्रा. रोहिदास भडकवाड, सीए रमेशजी फिरोदिया, सविताबेन फिरोदिया, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत पाटील खेमनर, विद्यापीठाचे अधिकारी आदी मान्यवर सदिच्छा भेटी देणार आहेत.
या श्रमसंस्कार शिबिर कालावधीत स्वयंसेवकांना प्रा. कल्पना शेळके क्रांती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य, प्राचार्य डॉ. सचिन घोलप आर्थिक साक्षरता, प्रा. निलेश परबत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली, प्रा. संदीप देशमुख विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान, प्रा.दत्तात्रय आसवले मराठी भाषा संवर्धन, प्रा. शिवनाथ तक्ते आनंदमय जीवन,विजय अहेर स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी, सौ.कविता गायकवाड कोरोना एक जैविक आपत्ती, रुपेश नाईकवाडी आजचे शिक्षण या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी / विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर ,प्रा. पोपट खेमनर ,प्रा. कल्पना शेळके, प्रा. संदीप कुदनर, प्रा. राजेंद्र लेंडे ,प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा. प्राची भोर, प्रा. गणेश साळुंखे, प्रा.योगेश साळुंखे, प्रा. लक्ष्मण कातोरे, प्रा. जयश्री राशिनकर, प्रा. शंकर राशिनकर, प्रा. अजित सहाने, प्रा. शेख मॅडम, प्रा. हाके मॅडम,प्रा.प्राजक्ता बिडवे व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व हिवरगाव पठारचे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत.
Comments
Post a Comment