कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

 


संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली परीसरात महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे तर ही घटना बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

                याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली शिवारातील नवीन घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मळकट कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर या इसमाच्या अंगात असुन तो  अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा आहे. सकाळच्या वेळेस दुध घालणार्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली पोलिस पाटील सुर्यवंशी यांनीही तातडीने घटनास्थळी जात पाहणी केली मात्र त्या इसमाची ओळख पटली नाही. याबाबतची माहिती सुर्यवंशी यांनी घारगांव पोलीस ठाण्यास दिली.घटनेची माहीती समजताच सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान हा इसम नेहमी भटकणारा, वेडसर असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु