कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर


घारगाव : संगमनेर तालुक्यातील मुळानदीवर असलेल्या आंबी-खालसा या बंधाऱ्यामधील लोखंडी ढापे चोरीला गेल्याची घटना ऑक्टोंबर महिन्यात घडली होती. त्यामुळे पाणी अडविणे शक्य नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व राजहंस दुध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष पाटील आहेर यांनी राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सुभाष पाटील आहेर यांनी सांगितले.

       आंबी-खालसा गावच्या हद्दीत मूळा नदीवर घारगाव –आंबी हा कोल्हापूर पद्धीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग घारगाव,आंबी खालसा,सराटी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांना होतो. आंबी-खालसा येथील शेतकरी ऑक्टोंबर महिन्यात पाणी अडविण्यासाठी ढापे टाकण्यासाठी गेले असता त्यांना ढापे आढळून आले नाही. ढापे चोरीला गेल्याचे लक्षात येताच आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . मात्र, चोरट्यांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी झाले नाहीत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व राजहंस दुध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष पाटील आहेर, आंबी खालसाचे माजी उपसरपंच सुरेश कान्होरे यांनी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मृद व जलसंधारण विभागाकडून या कामाचे ऑनलाईन टेंडर देखील काढण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरवात करण्यात येणार असून घारगाव, आंबी खालसा, सराटी, करवंदवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. यापुढे ढाप्यांची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतींची असणार आहे असेही यावेळी विखे पाटलांनी सांगितले.


पोलिसांनी शोध लावणे गरजेचे...


शासनाकडून केटीवेअर मंजूर झाले असले तरी चोरी गेलेले ढाप्यांचा शोध लागणे गरजेचे आहे. पोलिसांनी संबधित चोरीच्या संदर्भात संशयितांना  ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलिसांना काही राजकीय दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

               

      - सुभाष पाटील आहेर .

( मा. व्हा चेअरमन राजहंस दुध संघ )

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु