कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगांवात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 


संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाअंतर्गत असणार्या गणेशवाडी येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.


        याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथे विशाल प्रभाकर शेळके व आई विमल प्रभाकर शेळके हे दोघे राहत होते आई विमलबाई मोलमजूरी करत होती तर विशाल हा शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विशाल हा मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान घरी आला होता तर त्याने घरी आल्यानंतर राहत्या घराला आतमधून कडी लाऊन छताच्या लोखंडी  अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर आई विमलबाई ही कामावरुन घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू दरवाजा उघडत नसल्याने विमलबाई हीने आजुबाजुच्या नागरीकांना यांची कल्पना दिली. आजुबाजुच्या नागरीकांनी येऊन घराचा दरवाजा तोडला .तर आतमध्ये विशाल याने दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.नागरीकांनी तातडीने याबाबतची माहिती घारगांव पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक सुनिल पाटील पोलिस नाईक गणेश लोंढे, प्रमोद चव्हाण गणेश तळपाडे,, हरीचंद्र बांडे, नामदेव बिरे यांसह आदिंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरुन पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून  संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान विशाल शेळके यांच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून मी स्वतः आत्महत्या करत आहे व यास कुनासही जबाबदार धरू नये असे लिहीले होते. शेळके यांच्या दुःखद निधनाने घारगांव गावांसह परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु