कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली,


एक ठार; आठ जण गंभीर जखमी

       संगमनेर / तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान महामार्ग ओलांडणाऱ्या  शाळकरी मुलीला वाचवताना  भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर   मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

     नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. या दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली गेली.यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला. वैष्णवी मेंगाळ सह कारमधील वरील आठजण गंभीर जखमी झाले.   


    या भीषण अपघातात विजय शंकर डेरे (वय-६२,रा. नारायणगाव,जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. रोहित विजय डेरे (वय-२३) , उज्वला विजय डेरे (वय-४८) ,मोहित विजय डेरे (वय-३०) ,सविता अनिल शेटे (वय-४८) , शैला दिलीप वारुळे (वय-५८) , विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव , पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय-५४, रा. नांदूर,नाशिक) यांसह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय-१२ , सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळगाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

       अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी,पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे,योगीराज सोनवणे आदींनी  घटनास्थळी धाव घेतली. तर जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु