कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अज्ञात वाहणास धडक बसून एक जण ठार

 


संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव परीसरातील खंडोबा माळ हद्दीत आयशर टेंपोची अज्ञात वाहणास धडक बसून एक जण जागीच ठार झाला .तर ही घटना सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राम जतन सरोज (वय ३५ रा-भदोही उत्तर प्रदेश) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेंपो क्रमांक एम एच १२ एस एक्स ४७०६  घेऊन नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात होता घारगांव परीसरातील खंडोबामाळ हद्दीत सोमवारी पहाटे आला असता समोर चाललेल्या अज्ञात वाहण्यास पाठीमागून जोरात धडक बसून चालक राम सरोज हा जागीच ठार झाला.



दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतास खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु