कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

नवा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार_महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

     महाराष्ट्र राज्यात आता आधार कार्ड  प्रमाणेच एका कुटुंबासाठी एक नवे स्मार्ट कार्ड असणार आहे. याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  यांनी नाशिकमध्ये केली आहे.

       नाशिक येथे प्रसार माध्यमांशी  संवाद साधत असतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.की मागील आठवड्यात राज्यातील मंत्री आणि सचिवांनी हरियानाचा दौरा केला होता. त्यात त्यांनी हरियाणामध्ये कुटुंबासाठी परिवार प्रपंच पत्रिका नावाने कुटुंब पत्रिका आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही स्मार्ट कार्डची पद्धत महाराष्ट्रात राबविण्याचा विचार करण्यात आला आहे.एक परिवार कार्डबाबत महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन याची माहिती घेतली आहे. आधार कार्डची वैयक्तिक माहिती असते तसेच कुटुंब कार्डमध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती आहे. तेच धोरण आता महाराष्ट्रात आणण्याचा विचार सुरू आहे. संपूर्ण कुटुंबाचा डेटा एकत्रित असावा यासाठी ही कुटुंब स्मार्ट कार्डची योजना आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.



       याबाबत शासनाचा विचार सुरू असून स्थानिक पातळीवरुन कसा प्रतिसाद मिळतो, यासाठी चाचपणी देखील करण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु