कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

सरपंच सोनालीताई शेळके यांचा वाढदिवस असा झाला साजरा.

 


         संगमनेर  (सतीश फापाळे बोटा) तालुक्यातील पठार भागातील बोटा गाव तालुक्याच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जाणारे गाव आहे.या गावच्या ग्रामपंचायतिच्या विद्यमान सरपंच सौ. सोनालीताई संतोष शेळके यांनी गावातील अंगणवाडी,शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत आगळा वेगळा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यानं मध्ये रमत आपला वाढदिवस साजरा केला आहे.



       लोकनियुक्त सरपंच सौ सोनालीताई संतोष शेळके  यांची  सन २०२१ मध्ये बोटा गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झाली. त्यांनी आपले पती माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके यांची साथ मिळवत. त्यांचे मार्गदर्शनाखाली  आपल्या नेतृत्वाच्या आणि कर्तुत्वातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.ग्रामपंचायत बोटा गावचे उपसरपंच पांडूरंग शेळके,तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या विचार विनिमयाने गावच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे.



      आज १५ ऑक्टोबर हा दिवस लोकनियुक्त सरपंच सौ. सोनालीताई शेळके यांचा वाढदिवस नाथाबाबा विद्यालय बोटा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटा, बोटा केंद्रातील अंगणवाडी तळपेवाडी ,केळेवाडी ,माळवाडी, वडदरा येथे जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यानं मध्ये रममान होऊन आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेळके,संतोष शेळके सर्व शिक्षक वृंद ,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु