कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

 संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा फाट्यानजीक आंबी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी रवींद्र यशवंत भोर हे आंबीखालसा येथील रहिवासी असुन ते मजूरी करत होते मंगळवारी रात्री ते घारगांव वरून आपल्या राहत्या घरी आंबीखालसा येथे पायी जात होते.रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ते आंबीफाटा जवळच आंबी रोडवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.व वाहनचालक वाहणासह फरार झाला.ही गोष्ट रस्त्याने जाणाऱ्यां येणार्यांच्या लक्षात येताच तेथे मोठी गर्दी जमा झाली.घारगांव पोलिसांनाही माहीती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यात रवींद्र यशवंत भोर(वय - ५२) हे जागीच ठार झाले. मयत भोर यांस खाजगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले.शांताराम कोंडाजी भोर यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे करत आहेत.



दरम्यान भोर यांच्या आकस्मिक निधनाने आंबीखालसा गावांसह माळेगांव पठार, घारगांव गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु