कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पठार भागात चक्क शासनाच्या मालमत्तेची झाली चोरी..



आता तर हद्दच झाली राव.. चक्क शासनाच्या मालमत्तेचीच चोरी झाली आहे आतातरी यांना कोणी आवर घालील काहो.. अशी म्हणण्याची वेळ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव व आंबीखालसा येथील ग्रामस्थांवर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घारगांव व आंबीखालसा दोनही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या केटीवेअरचे  ढापेच चोरट्यांनी चोरुन नेले आहेत . त्यामुळे भविष्यात दोनही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. याबाबत आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी घारगांव पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दिली आहे. त्यात असे म्हणले आहे की,आंबीखालसा गावचे शिवारातील मुळा नदीवरील केटि वेअरचे ढापे २२ ऑक्टोबर रोजीचे सायंकाळी ७ वा नंतर ते २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ढापे चोरून नेले आहेत अश्या आशयाची फिर्याद दाखल केली आहे.तर याबाबत अज्ञात चोरटयाविरोधात गु र नं ३४८/२०२२ भा द वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहेत.

दरम्यान दिवसेंदिवस पठार भागात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून यापुर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या केबल,मोटारी,


शेतीमाल,दुचाकी चोरी,चारचाकी चोरी , घरफोडी, व्यावसायिकांचे दुकाने फोडून चोरी अश्या घटना वारंवार घडत आहेत.मात्र या चोरांचा तपास लावण्यात घारगांव पोलीस अपयशी ठरत आहेत असे सर्व सामान्य जनतेमधून बोलले जात आहे.आता तरी या चोरट्यांचा शोध‌ घेऊन चोऱ्यांना लगाम लावावा अशी मागणी सर्व सामान्य जनतेमधून होत आहे.













घारगांव‌ व आंबीखालसा गावांसाठी मुळा नदिवरील हा केटिवेअर वरदान ठरलेला आहे. दोनही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामाध्यमातून सुटलेला आहे.मात्र आता नदिला पाणी आल्यानंतर या केटिवेअरचे ढापे काढून ठेवले होते. परंतू चोरट्यांनी हे ढापे चोरुन नेल्याने भविष्यात दोनही गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे.


नितीन आहेर

(सामाजिक कार्यकर्ते घारगांव)
































Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु