कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

ऐन सणासुदीच्या काळात आले मोठे संकट

 




संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहणाऱ्यां अंकुश राजू शेळके यांचे चारचाकी वाहन बोलेरो जीप चोरीला गेल्याची घटना बुधवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अंकुश राजू शेळके हे आपल्या कुटुंबासोबत बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहत आहेत.व त्यांच्याकडे  बोलेरो जीप होती. मंगळवारी रात्री शेळके यांनी जीप घरासमोर उभी करुन जेवन झाल्यानंतर झोपले होते .पहाटे कुटुंबातील व्यक्ती उठून बाहेर आल्यानंतर त्यांना बोलेरो जिप दिसली नाही ही घटना कानोकान जाताच अनेकांनी धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू जीप कोठेच आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी घारगांव पोलीस स्टेशन गाठत आपली व्यथा मांडली.











पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याच शेजारी राहत असलेला चुलतभाऊ रामभाऊ शेळके यांचीही क्रुझर जीप चोरून नेली आहे.तीचाही अजून शोध लागला नाही तोच रात्री बोलेरो जीप चोरीला गेली आहे . त्यामुळे शेळके यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या आनंदी उत्साही काळातच ही चोरी झाल्याने आनंदावर विरजण पडले असून दिवाळीत आमचे दिवाळे निघाले असल्याचे मत अंकुश शेळके यांनी पठार वार्ता शी बोलतांना व्यक्त केले आहे. व आम्हाला आता डोक्यालाच हात लावण्याची वेळ आली आहे असेही शेळके म्हणाले.



बोटा परीसरातून यापुर्वी अनेक शेतकऱ्यांच्या विहीरींवरील मोटार,केबल, शेती उपयोगी साहित्य, शेतीमाल,दुचाकी घरफोडी अश्या एक ना अनेक घटना घडल्या आहेत. त्यात यशवंत शेळके यांच्या तोडणीला आलेल्या डाळींब फळांची चोरी झाली होती त्यानंतर पंचायत समिती सदस्य संतोष शेळके,पांडू शेळके यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने  सहकाऱ्यांच्या मदतीने आळेफाटा येथील बाजार समितीत चोरट्यांचा शोध लावून घारगांव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतरही आजतागायत चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. पंधरा दिवसांत दोन चारचाकी वाहनांचीही चोरी झालेली आहे त्यामुळे घारगांव पोलिसांनी तातडीने चोरट्यांना जेरबंद करावे व बोटा गावाला भयमुक्त करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके,सरपंच सोनाली ताई शेळके,उपसरपंच पांडू शेळके, यशवंत शेळके,सुनिल कणसे,सुहास वाळुंज म्हतु पाडेकर, म्हतु पानसरे,मुनिर शेख,सचिन काळे, सोसायटीचे चेअरमन सुखदेव शेळके, व्हाईस चेअरमन जिजाभाऊ शेळके,राजेश वाळुंज, प्रकाश शेळके, रज्जाक शेख,सतीष माळी, अंकुश शेळके, रामभाऊ शेळके यांसह आदि ग्रामस्थांनी केली आहे.





















Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु