कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / संगमनेर रणखांब मार्गे राहुरी बस पुर्ववत तातडीने चालू करा अन्यथा विद्यार्थी ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांनी संगमनेरचे आगारप्रमुख श्री. पाटील यांना निवेदनाद्वारे दिला होता. परंतु निवेदन देऊनही बस चालू न केल्याने अखेर युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रणखांब फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा एल्गार यावेळी आंदोलन कर्त्यांनी पुकारला होता. जवळपास एक ते दीड तास रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबतची माहिती मिळताच संगमनेर आगार प्रमुख श्री. पाटील यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. तसेच आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. परंतु आमची मागणी मान्य करा अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
यावेळी आगार प्रमुख पाटील यांनी येत्या १ नोव्हेंबर पासून सदर बससेवा पुर्ववत चालू करू असे आश्वासन दिल्यानंतर अखेर दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, संगमनेरहून - चंदनापुरी, रणखांब - म्हैसगाव मार्गे राहुरी बस ही पुर्वी सुरळीत चालू होती. परंतु कोरोना काळापासून ही बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. सदर बसची वेळ संगमनेर येथुन दुपारी ४ वाजता राहुरीकडे सोडण्यात येत होती. तसेच राहुरीकडुन सकाळी साडेआठ वाजता संगमनेर कडे असा रुट होता. त्यामुळे प्रवासी तसेच रणखांब येथे शिकणा-या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शाळेत येण्या - जाण्यासाठी सोय होत होती. तसेच या रुटवरील कुंभारवाडी, दरेवाडी, शेळकेवाडी येथील ५० ते ६० असे सर्व विदयार्थी या बसने रणखांब येथील विद्यालयात शिकण्यासाठी येतात. तसेच संगमनेर या ठिकाणी प्रवाशांसह विद्यार्थी ये - जा करत होते. परंतु सदर बससेवा बंद झाल्यामुळे सर्व विद्यार्थी व प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहे. तरी तातडीने ही बस सेवा सुरळीत चालू करावी अशी मागणी होती.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ बारवे, उप तालुकाप्रमुख उज्वलाताई गुळवे, कैलास गुळवे, पाटोळे सर, अमोल वाजगे, नवनाथ भोसले, रंजीत ढेरंगे, बाळू झिटे, संतोष शेटे, भाऊराव ढेरंगे, संतोष वनवे, गणेश डोंगरे, गणेश परचंडे, दीपक खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर, मंत्री खेमनर, डॉ. वर्पे, सुभाष गागरे, राजाबाबू वर्पे, शिवाजी नरवडे, सुभाष ढेंबरे, लहानु सागर, गोरख सागर, आनंदा सागर, जयराम गुळवे, सागर शेजवळ, सतीश मनसुख, शरद वाजगे, भाऊसाहेब मोघे, दत्ता मोघे, विलास मोघे, दीपक मोघे, उल्हास गागरे, नवनाथ गागरे, बाळासाहेब घाडगे यांच्यासह पठारभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment