कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

मांडवे बु.जि. प.प्राथमिक शाळेत जागतिक हात धुवा दिन साजरा.

 



            संगमनेर / तालुक्यातील साकुर परिसरातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १५ ऑक्टोंबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला आहे.

          स्वच्छ भारत आभियान अंतर्गत निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस युनिसेफने विकसनशील व गरीब देशांत काम करण्यास सुरवात केली तेव्हा पाणी व स्वच्छतेचे महत्त्व विशद झाले. २००८ मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे पहिला जागतिक जलसप्ताह आयोजित करण्यात आला. याच ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यावेळी उपक्रमातील ७० पेक्षा जस्त देश सहभागी झाले होते. आता मात्र बहुतेक देश सहभागी होत आहेत.



      जागतिक हात धुवा दिनाचे निमित्ताने  मांडवे बु. गावचे सामाजिक कार्यकर्ते अँड.अमित धुळगंड, पत्रकार रमजान शेख, जि. प. प्राथमिक शाळा मांडवे बु. सर्व शिक्षक , विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आहे.



         यावेळी वारंवार होणारे संसर्गजन्य आजार तसेच रोगराई पासून दूर राहण्यासाठी, नेहमीत हात धुणे गरजेचे आहे. आपण जर आपली हाताची स्वच्छता चांगली ठेवली तर, आपल्याला होणारे संसर्गजन्य आजार यांपासून दूर राहू, लहान मुलांकडे सर्व पालकांनी लक्ष देणे हे गरजेचे आहे असं मार्गदर्शन ऍडव्होकेट अमित धुळगंड यांनी केले.

यावेळी  विलास कुटे, रईस भाई आतार, नामदेव अष्टेकर, लक्ष्मण धुळगंड यांसह आदी ग्रामस्थ  उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु