कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जांबूत हादरले...' या ' कारणाने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू...

संगमनेर (पठारवार्ता वृत्तसंस्था)  :  १९ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळ्यात घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 




पुजा भगवान नरवडे असे मृत तरुणीच नाव आहे. बिबट्याने तरुणीचा गळा पकडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.



                   ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जांबुत येथील जोरीमळा येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुजा ही काही कामासाठी बाहेर आली. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने पुजावर झडप मारून मानेला पकडून ओट्यावरून तिला शेजारील उसाच्या शेतात 200 फुट अंतरावर ओढत नेले. तिच्या आईने आरडाओरडा केल्यावर लगेचच शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी बिबट्याने पुजाला तेथेच सोडून पळ काढला. परंतु बिबट्याने थेट तिच्या मानेला पकडल्याने गंभीर जखमी झालेल्या पुजाचा जागेवरच मृत्यू झाला होता.

                   जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महिन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात 19 वर्षीय युवतीवर हल्ला करून ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट भागातील नागरीक प्रंचड भयभीत झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु