कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

मुसळधार पावसाने पठार भागातील अनेक पाझर तलाव...

 पठार भागातील पाझर तलाव ओसंडून वाहू लागले

पठार भाग झाला जलमय..


संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागात गणरायाच्या आगमनापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील पाझर तलाव ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

          ३१ ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन झाले. त्याच दिवशी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तेंव्हापासून दिवसाआड होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परीसरातील पाझर तलाव, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. आंबीखालसा परीसरात गणपीरबाबा हा लघु पाटबंधारेचा ६२ एम सेप्टिचा पाझर तलाव आहे. हा पाझर तलाव शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे आंबीखालसा,घारगांव ,बोरबन, सराटी आदी गावांच्या लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 


 घारगांव परीसरातील बोल्हाई माता व म्हसोबा महाराज  तलावही शुक्रवारी पहाटे ओसंडून वाहू लागले आहेत. वर्षभरासाठी शेतकऱ्यांना शेती सह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. 


 गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने ठिकठिकाणी उभ्या पिकांत पाणी साठले आहे. बाजरी, सोयाबीन, वाटाणा, कांदा, मिरची,ऊस अशी विविध पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यास या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे

    


 

परतीच्या दमदार पावसाने पाझर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहेत. मात्र, झालेल्या पावसाने ठिकठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेताचे बांध फुटले असून माती वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे प्रशासनाने सर्व्हे करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.


सुरेश गाडेकर

(सामाजिक कार्यकर्ते आंबी खालसा)



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु