कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पाणी पातळी वाढल्यास शाळेला सुट्टी

 सीडी वर्क पुलाची उंची वाढवावी ; गणपीरदरा ग्रामस्थांची मागणी विद्यार्थ्यांची गैरसोय 


संगमनेर / तालुक्यातील आंबी खालसा गावांतर्गत असणाऱ्या गणपीरदरा येथे पावसाळ्यात चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत आहे. येथे बांधण्यात आलेल्या सीडी वर्क पुलावरून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. शाळेत न जाता पुलाच्या अलीकडे एखाद्या शेडमध्ये शाळा भरवली जात असल्याचे चित्र आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबी खालसा गावांतर्गत गणपीरदरा लोकवस्ती आहे. येथे गणपीबाबा पाझर तलाव आहे. या पाझर तलावात जवळे बाळेश्वर,वरुडी पठार,सारोळे पठार,डोळासणे,माळेगाव पठार या गावांच्या परिसरात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीने रहाटीच्या ओढ्याद्वारे पाणी येते. ओढ्याच्या पलीकडे १ ली ते ४ थी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी या ओढ्यावर १५ वर्षांपूर्वी सीडी वर्क पुल बांधण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यामुळे या पुलावरून विद्यार्थी व शिक्षकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. अनेकदा पाण्याचा प्रवाह वाढल्यास शाळेत जाणे शक्य होत नाही. संबधित विभागाने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. 


 गणपीरदरा रस्त्यासाठी निधी दिला आहे. येथील सीडी वर्क पुलाची पाहणी करून त्यासाठी निधी उपलब्ध करून तेही काम मार्गी लावू. 

 डॉ. किरण लहामटे

( आमदार अकोले विधानसभा मतदारसंघ)

पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे मुलांना पलीकडे शाळेत नेणे शक्य होत नाही. आम्ही अलीकडे वस्तीवरच शाळा भरवतो. 

शांता हडवळे

(मुख्याध्यापिका )

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओढा ओलांडून जावे लागते. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास शाळा बंद ठेवावी लागते. या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. 

 बाळासाहेब ढोले 

( सरपंच आंबीखालसा )



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु